अवघ्या दोनच तासांत पाकिस्तानचे ‘घुमजाव’

शस्त्रसंधी धुडकावून पुन्हा भारतावर ड्रोन हल्ले : श्रीनगरसह सीमेवरील सर्व राज्यांमध्ये हायअलर्ट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10th May, 11:38 pm
🚨श्रीनगर : पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांतच नियंत्रण रेषेवर तिचे उल्लंघन केले. ✈️पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने ते सर्व ड्रोन हवेतच पाडून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. 🔦या घटनेनंतर जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक सीमावर्ती भागात खबरदारी म्हणून 'ब्लॅकआउट' करण्यात आला.

⏱️शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर सुमारे तीन ते चार तासांनी, पंजाबमधील पठाणकोट परिसरात प्रथम पाकिस्तानी ड्रोन दिसले. 💡त्यानंतर पठाणकोट आणि गुरुदासपूरमध्ये तातडीने पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला. 🚨हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही सक्रिय करण्यात आले होते.

🎯पठाणकोटसह जम्मू, सांबा आणि आर.एस. पुरा यांसारख्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. 🛡️मात्र, भारतीय सैन्याने सतर्कता दाखवत हे सर्व ड्रोन त्वरित हवेतच उद्ध्वस्त केले. 🌃फिरोजपूरसह जम्मू आणि राजस्थानच्या काही सीमावर्ती भागातही ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता. 💥ड्रोन पाडण्याच्या कारवाईव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्फोटाचा आवाज आल्याचे वृत्त नव्हते. ⚠️या उल्लंघनामुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

🗣️ओमर अब्दुल्लांकडून नाराजी व्यक्त
पठाणकोटसह अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारतीय सैन्याने हवेतच उद्ध्वस्त केले. 👤दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विचारले की, शस्त्रसंधीचे काय झाले? पाकिस्तानच्या या कृतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
📍महत्त्वाचे मुद्दे
1️⃣ राजस्थानमधील बाडमेर, जैसलमेर जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला. यामुळे प्रशासनाने लगेच ब्लॅकआउटची घोषणा केली.
2️⃣ प्रशासनाने हवाई हल्ल्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांना घरातच राहण्याचा आणि दिवे बंद ठेवण्याचा आदेश दिला.
3️⃣ पोखरण आणि आसपासच्या भागात स्फोटांचे मोठमोठे आवाज ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात भीतीचे वातावरण आहे.
4️⃣ भारतीय सेना पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये असून पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले गेले.
🕊️भारत - पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी ट्रम्प प्रशासन यशस्वी
🇺🇸नवी दिल्ली : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे निर्माण झालेल्या दबावाखाली पाकिस्तानने शनिवारी (१० मे २०२५) शस्त्रसंधीची घोषणा करण्याची अमेरिकेकडे विनंती केली. याला भारत सरकारने सशर्त सहमती दर्शविली. ⚠️तथापि, भारताकडून पाकिस्तानवर लादलेले बिगर-लष्करी निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.

📞सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई तळांवर झालेल्या निर्णायक हल्ल्यांच्या मालिकेनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीवर सहमती दर्शविण्यासाठी भारताला विनंती केली. 🇵🇰पाकिस्तानी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) त्यांच्या भारतीय समकक्षांना फोन करून यापुढे कोणतेही हल्ले करणार नसल्याचे स्पष्ट केले आणि औपचारिकपणे शस्त्रसंधीची विनंती केली.

⚖️भारताने केवळ 'गतिमान' म्हणजेच लष्करी कारवाईसाठीच शस्त्रसंधी जाहीर केली आहे, तीही अटींसह. 🛑पाकिस्तानकडून भारताला होणारा त्रास अजून पूर्णपणे संपलेला नाही.

💣२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले होते. 🔒हे निर्बंध कायम राहतील. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित ठेवणे, कोणतेही व्यापारी संबंध पुन्हा सुरू न करणे, राजनैतिक पातळीवर 'जैसे थे' स्थिती राखणे (पाकिस्तानातून परत पाठवलेले राजदूत परत बोलावले जाणार नाहीत) आणि आर्थिक निर्बंध सुरू ठेवणे (कोणतेही मालवाहू जहाज भारतीय बंदरांवर येऊ शकणार नाहीत) यांचा समावेश आहे. 🚫या निर्बंधांवर कोणतीही चर्चा झालेली नाही.

💰अमेरिकेने पाकिस्तानवर थेट दबाव आणून तणाव कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 🏦अमेरिकेने तत्काळ शस्त्रसंधीच्या बदल्यात १ अब्ब डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) कर्ज थांबवण्याचा दबाव पाकिस्तानवर आणला होता.

हेही वाचा