उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिऊनही दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवतोय? ही आळसाची लक्षणे नसून शरीरातील पोषक घटकांच्या शोषणातील कमतरता असू शकते. यामागील खरी कारणे आणि उपाय.

तुम्ही पौष्टिक आहार घेता, पाणी पिता, व्यायामही करता... पण तरीही दुपारनंतर थकवा जाणवतो, मेंदू सुस्त होतो आणि ऊर्जा कमी वाटते का?
समस्या तुमच्या इच्छाशक्तीमध्ये नाही. समस्या तुमच्या पोषक घटकांच्या शोषणामध्ये असू शकते.
का होतंय असं?
पौष्टिक आहार घेतला तरीही आपल्या शरीराला काही महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत कारण:
१. मातीची गुणवत्ता कमी झाली आहे - आजच्या पिकांमध्ये ५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत ४०% कमी पोषक घटक असतात.
२. ताण आणि पचन - ताण, कॅफिन आणि खराब पचनामुळे पोषक घटकांचे शोषण कमी होते.
३. पोषक घटकांमध्ये "पोकळी" - मॅग्नेशियम, B12, लोह आणि व्हिटॅमिन D सारखे घटक अन्नातून पुरेसे मिळत नाहीत.
सगळ्यात जास्त कमतरता असणारे 3 पोषक घटक
१. मॅग्नेशियम - ३०० + शारीरिक क्रियांसाठी लागते. कमतरता = थकवा, स्नायूंची पेटके, झोप न लागणे.
२. व्हिटॅमिन B12 - ऊर्जा आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक. कमतरता = अशक्तपणा, चक्कर, लक्ष केंद्रित न होणे.
३. लोह - ऑक्सिजन वाहतुकीसाठी लागते. कमतरता = दम लागणे, फिकटपणा, थकवा.
यावर उपाय काय?
फक्त जास्त खाणे हा उपाय नाही. चांगले शोषण हा उपाय आहे.
तुमच्या शरीराला इंधनापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे. त्याला पोषण हवे आहे.
तुम्ही पौष्टिक खात असाल, तरीही तुमच्या शरीराला आतून मदतीची गरज असू शकते......
- डॉ. मीनल जोशी
उपसंचालक, आयुष विभाग,
गोवा सरकार