यापुढे मंत्र्यांना जनतेशी संवाद साधणे बंधनकारक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
19th September, 05:03 pm
यापुढे मंत्र्यांना जनतेशी संवाद साधणे बंधनकारक

पणजी : यापुढे सर्व मंत्र्यांना जनतेची संवाद साधणे बंधनकारक असणार आहे. सर्व मंत्र्यांना मंत्रालयात जनतेशी संवाद साधण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सर्व मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस एका मंत्र्याने पणजीतील भाजप कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणेही बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक गुरूवारी पार झाली. बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा