Home >> देश -परदेश >> २६ दिवसांच्या उपोषणानंतरही माझे कॅरेक्टर सर्टिफिकेट हवे ? वांगचुक यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल!

२६ दिवसांच्या उपोषणानंतरही माझे कॅरेक्टर सर्टिफिकेट हवे ? वांगचुक यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल!

नीट पेपरफुटीविरोधात २६ दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
8 mins ago
२६ दिवसांच्या उपोषणानंतरही माझे कॅरेक्टर सर्टिफिकेट हवे ? वांगचुक यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल!

नवी दिल्ली : 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या विरोधात तब्बल २६ दिवस उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. उपोषण सोडण्यावरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्या आणि 'सरकारसोबत सौदा केल्याचा' आरोप लावणाऱ्या ट्रोलर्सना त्यांनी अत्यंत रोखठोक भाषेत सुनावले आहे.



२६ दिवसांनंतर मला काय सिद्ध करायचे आहे?

व्हिडिओमध्ये आपला संताप व्यक्त करताना सोनम वांगचुक म्हणाले, २६ दिवसांच्या कठोर उपोषणांनंतरही मला माझ्या  आंदोलनाची प्रामाणिकता सिद्ध करावी लागत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय? जर मला सरकारशी तडजोड किंवा कसला सौदाच करायचा असता, तर मी इतके दिवस उपाशी राहण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. आलिशान खोल्यांमध्ये बसून सौदे केले जातात, कडक उन्हात आणि थंडीत जमिनीवर झोपून नाही!


Sonam Wangchuk ends 26-day fast, cites 'long negotiation' on conditions,  'possible violence' in country | India News - The Indian Express


माझे ११ किलो वजन घटले!

आपल्या भावना व्यक्त करताना वांगचुक पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मला लढा द्यावा लागला. या उपोषणात माझे ११ किलो वजन कमी झाले आहे. लडाखच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दिल्लीच्या तीव्र उन्हापर्यंत मी शरीर झिजवले. तरीही मला माझ्या चारित्र्याचे प्रमाणपत्र द्यावे लागत असेल, तर हे दुःखद आणि धक्कादायक आहे. जिथून अशी नीच मानसिकता आणि विचार जन्माला येतात, त्या मानसिकतेला खरोखर लाज वाटली पाहिजे!


Wangchuk says he will end fast if Centre assures no action against  protesting students


केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

'नीट' परीक्षेतील धांदलीविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या वांगचुक यांनी २३ जुलै रोजी रात्री उशिरा सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले होते. परंतु, "उपवास केंद्रीय मंत्र्यांच्या हातूनच का सोडला?" असा सवाल उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा