काणकोण : धुपेमळ भाटपाळ काणकोण येथील एका घरात शनिवारी रात्री विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाला. समेश शरण गवंडर (११) असे त्याचे नाव असून तो चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात सहावीत शिकत होता. विजेचा धक्का कसा लागला याचे नेमके कारण समजू शकले नाही. रविवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर पैंगीण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ आहे.