सीमाभाग : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या २५० हून जास्त गाड्या बंद

काय कारण ? जाणून घ्या सविस्तर

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
24th February, 10:35 am
सीमाभाग : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या  २५० हून जास्त गाड्या बंद

पुणे : महाराष्ट्रातून दिवसाला साधारण अडीचशे बस कर्नाटकात जातात. तर, कर्नाटकातूनदेखील तेवढ्याच बस महाराष्ट्रात येतात. पुण्यातून कर्नाटकातील बेळगाव, कलबुर्गी, विजापूर या शहरांसाठी आठ ते नऊ बस धावतात. तसेच, सहा ते सात बस कर्नाटकातून पुण्यात येतात.


पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बसचालकाला कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फास्ट मारहाण केली. यानंतर सीमावादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सीमाभागात सध्या तणावग्रस्त वातावरण असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या पोलिसांकडून रोखण्यात आल्या आहेत. 


 

नेमके काय प्रकरण ? 

दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या चालकास कानडी भाषा येत नसल्याच्या कारणावरून कर्नाटकात मारहाण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या बस काळे फासले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोल्हापूर आणि पुण्यात शनिवारी आंदोलन करण्यात आले. या मारहाणीमुळे राज्यात वातावरण तापले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही राज्याच्या सार्वजनिक बस सीमेवर थांबविल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या दरम्यानची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रविवारी सकाळपासून बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसल्याचे दिसून येत आहे.



सध्या या बस कागल येथे  कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांवण्यात येत आहेत. त्यामुळे पुण्यातून कर्नाटकात जाण्यासाठी कोल्हापूर सीमेपर्यंत जावे लागते. तेथून पुन्हा कर्नाटकाच्या बसने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची मात्र आबाळ होत आहे. 


हेही वाचा