‘अॅनिमल’वरून संदीप-शाहरूखमध्ये शीतयुद्ध!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th February 2024, 07:41 pm
‘अॅनिमल’वरून संदीप-शाहरूखमध्ये शीतयुद्ध!

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चर्चा थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला असला तरी याविरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे. रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेला हिंसाचार बॉलिवूडमधील बड्या व्यक्तींना आवडला नाही. चित्रपटाबाबत चर्चा सुरूच आहे. यावर जावेद अख्तरपासून शाहरुख खानपर्यंत सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये शाहरुख खानने त्याच्या चित्रपटांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शाहरूखने सांगितले की, त्याने जर एखाद्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यास तो हे निश्चित करेल की खलनायक कुत्र्यासारखा मरेल. शाहरुखचे हे वक्तव्य रणबीरच्या ‘अॅनिमल’च्या संदर्भात पाहायला मिळाले. असे मानले जात होते की किंग खान ‘अॅनिमल’चा उल्लेख करत आहे. तरी त्याने कोणाचे नाव घेतले नाही. दरम्यान, आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचे वक्तव्य समोर आले आहे.


एका मुलाखतीदरम्यान संदीपने कोणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर दिले. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. रणबीरच्या चारित्र्याच्या ग्लोरिफिकेशनवर संदीपला प्रश्न पडला होता. उत्तर देताना ‘अॅनिमल’चा दिग्दर्शक म्हणाला, लोकांना ‘ग्लोरिफाई’ म्हणजे काय हे देखील माहित नाही. लोकांना वाटते की शेवटी नायक ‘लेक्चर’ देतो. जिथे तो आपली चूक मान्य करतो की त्याने या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. आपण कुत्र्याला मारले पाहिजे. तेव्हा लोकांना वाटते की यातून चांगले घडले. त्यामुळे असे करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करत आहात. सामान्य माणसांना सोडा, मोठ्या कलाकारांनाही ही गोष्ट समजत नाही.

संदीपने शाहरुखचे नाव न घेता केवळ हातवारे करत त्याला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. मात्र, संदीप रेड्डी वंगा ‘अॅनिमल’च्याविरोधात जे कोणी विधान करत आहेत त्याचे खंडन करताना दिसत आहे.