करंजाळेतील कृषी कार्यालयाजवळ बसले उपोषणाला

पणजी : पेडणे (Pernem, Goa) येथील प्रगतीशील शेतकरी (Farmer) उदय प्रभुदेसाई टोंक, करंजाळे येथील कृषी खात्याच्या मुख्यालयातील व्हरांड्यात उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. पेडणे तालुक्यातील कापणी प्रक्रियेत गोंधळ व गैरव्यवस्थापन (Mismanagement) असल्याचा दावा त्यांनी केला.
त्याचा निषेध करण्यासाठी आपण उपोषणाला बसलो असल्याचे सांगितले.
शांतपणे उपोषण करून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्या, आव्हानांकडे वळवावे हा त्यामागे हेतू आहे. कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना चालना द्यावी. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शेतकरी उदय प्रभुदेसाई यांनी केली आहे.