१५ वर्षांवरील ४४.६ टक्के पोर्टलवर करतात तक्रार : राष्ट्रीय सरासरी केवळ १७.७ टक्के इतकीच
पणजी : सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीबाबत केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवण्यासाठी गोमंतकीय नागरिक देशात सर्वाधिक सक्षम असल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान गोवा तसेच संपूर्ण देशात केलेल्या सर्वेक्षणानुसार, गोव्यातील १५ वर्षांवरील ४४.६ टक्के व्यक्तींना पोर्टलवर तक्रार करता येते. याची राष्ट्रीय सरासरी केवळ १७.७ टक्के इतकी आहे.
"या सर्वेक्षणात राज्याच्या लोकसंख्येनुसार १५ वर्षांवरील शहरी, ग्रामीण, महिला आणि पुरुषांची निवड करण्यात आली होती. त्यांना सायबर गुन्हे आणि त्याबाबत पोर्टलवर तक्रार करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले."
चंदीगडमध्ये हे प्रमाण सर्वाधिक (५२.३%) असून ते गोव्याहूनही अधिक आहे.