मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र राज्यातील २८८ जागांसाठी महाविकास आघाडी (MVA) यांच्यात मंगळवारी जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुमारे ४ तास चालली. 'मविआमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. यापुढे बैठका होणार नाहीत. बुधवारी पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा करणार आहे', असे बैठकीनंतर शिवसेना उद्धव नेते संजय राऊत म्हणाले
समोर आलेल्या माहितीनुसार,मविआमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस १००-१०५, शिवसेना (उबाठा) ९६-१०० आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ८०-८५ जागांवर लढणार आहे. इतर पक्षांना ३-६ जागा मिळू शकतात.
२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्य विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. सोमवारी जागावाटप निश्चित होण्यापूर्वी, शिवसेना (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की मविआमधील २८८ विधानसभा जागांपैकी २१० जागांवर करार झाला आहे. मागेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुपचुप भेटीमुळे 'मविआ'त सर्व काही आलबेल नसल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र आघाडीच्या या बैठकीने अफवांची जाळमटे दूर झाल्याचे दिसत आहे.
समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी १९ ऑक्टोबर रोजी धुळे विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली. आम्ही मविआ कडून १२ जागा मागितल्या आहेत. जागांचा तपशीलही त्यांना पाठवण्यात आला आहे, यानंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले
१८ ऑक्टोबर रोजी पक्षाने भिवंडी पूर्वमधून विद्यमान आमदार रईस शेख, भिवंडी पश्चिममधून रियाझ आझमी आणि मालेगाव मध्यमधून शान-ए-हिंद यांना उमेदवारी जाहीर केली होती. आम्ही पाच उमेदवार जाहीर केले आहेत, आमची ताकद सपाचे दाखवून देण्याचा आमचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी म्हणाले होते -
भाजपने अलीकडेच विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापैकी ६ जागा एसटीसाठी आणि ४ जागा एससीसाठी आहेत. त्याचबरोबर १३ जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर १० उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. तीन विद्यमान अपक्ष आमदारांनाही तिकीट देण्यात आले आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तर भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिकीट देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात महायुती म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. सत्ताविरोधी आणि सहा मोठ्या पक्षांमध्ये मतांचे विभाजन हे पक्षांसमोर मोठे आव्हान असेल. महाराष्ट्रात महायुतीचे म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. सत्ताविरोधी आणि सहा मोठ्या पक्षांमध्ये मतांचे विभाजन हे साधना पक्षासमोर मोठे आव्हान असेल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी इंडि आघाडीला ३० तर एनडीएला १७ जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला ९ , शिवसेनेला १ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला केवळ १ जागा मिळाली. भाजपने २३ जागा गमावल्या.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४१ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये हा आकडा ४२ होता.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनुसार भाजपच्या जवळपास ६० जागा कमी होतील. विरोधी आघाडीच्या सर्वेक्षणात एमव्हीए म्हणजेच महाविकास आघाडीला राज्यातील २८८ जागांपैकी १६० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठा आंदोलन हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्ष फूटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनतेची सहानुभूती आहे.