उष्णतेच्या लाटेमुळे डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, बेशुद्धी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उष्माघातापासून आपल्या बचाव करणे जिकरीचे आहे.
पणजी : गोव्यात सध्या अनेक भागांत कडक ऊन पडत आहे. असे हवामान आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. हे तुम्हाला आजारी बनवू शकते. पारा वाढल्याने अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता होणे हीच आहे. यामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, जो प्राणघातक देखील ठरू शकतो. उष्णतेच्या वाढत्या प्रभावामुळे उष्माघाताची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, शुद्ध हरपणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
१ . उष्माघात टाळण्यासाठी, शरीरात निर्जलीकरण होऊ देऊ नका.
२ .घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.दर दोन तासांनी पाणी प्या.
३ .उन्हात गेल्यास डोके झाकून डोळ्यांवर चष्मा घाला.
४ .सनस्क्रीन लावायला विसरू नका
५ .टरबूज, खरबूज, उसाचा रस, लिंबूपाणी सारखी पेये घ्या
१ . फूड पॉयजनिंग
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात पोट बिघडणे, उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू लागतात. याचे कारण अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉयजनिंग आहे. या ऋतूमध्ये अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात, हे अन्न खाल्ल्यास विषबाधा होते. त्यामुळे जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका, रस्त्यावरील खाद्यपदार्थही टाळा.
२. टायफॉइड
उन्हाळ्यात टायफॉइडची समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. हा आजार खाण्याच्या सवयींमुळेही होतो. या आजारात ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, थकवा यासारख्या समस्या होतात. अलीकडच्या काळात टायफॉइडच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील अन्न आणि शिळे अन्न टाळावे.
३ . डोळ्यांची साथ
उन्हाळ्यात येणारी उष्णतेची लाट डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली नसते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांच्या अनेक धोकादायक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेव्हाही उन्हात बाहेर जाल तेव्हा डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा लावा. दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.