हा वाद राजकीय लाभासाठी : भागवत


22nd July 2021, 02:18 am
हा वाद राजकीय लाभासाठी : भागवत

हा वाद राजकीय लाभासाठी : भागवत
गुवाहाटी :
देशातील मुस्लिमांचे सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. सीएए आणि एनआरसीसंदर्भात सुरू असलेला वाद राजकीय फायद्यापोटी घातला जात असल्याचे यावेळी बोलताना म्हटले आहे. सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्यांचा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही. त्याभोवती अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.