पणजी : मेरशी येथील आरोग्य केंद्राजवळ जलवाहिन्या जोडण्याचे तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या ८ सप्टेंबर रोजी सांताक्रूझ, ताळगाव, रायबंदर (पणजी) आणि बांबोळी (सांत आंद्रे) परिसरात उद्या ८ सप्टेंबर रोजी सकाली ८ ते रात्री वाजेपर्यंत मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे.
हे काम सकाळी ८ वाजल्यपासून सुरू होणार आहे. आणि रात्री ८ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्यात अडथळा किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कामाच्या कालावधीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलपुरवठा खात्यातर्फे करण्यात आले आहे.


