बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग; वर्षभरानंतर भावांनी तलवारीने कापला भावोजीचा गळा!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 10:36 am
बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग; वर्षभरानंतर भावांनी तलवारीने कापला भावोजीचा गळा!

यमुनानगर : हरियाणातील यमुनानगर येथून एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनात बाळगलेल्या भावांनी मित्रांसह भावोजीचा गळा तलवारीने कापला आहे. विशेष म्हणजे बहिणीला वर्षाचे मूल आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे संपूर्ण हरियाणात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या पाच नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.

अभिषेक आणि ऋषूने घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दोघेही जवळपास एक वर्ष झिरकपूर येथे राहत होते. रविवारी रात्री अभिषेक त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी यमुनानगर येथे आला होता. याची माहिती ऋषूच्या दोन भावांना मिळाली. त्यांनी आपल्या मित्रांसह घटनास्थळावर जाऊन अभिषेक आणि त्याच्या दोन मित्रांवर तलवारीने सपासप वार केले. यात गळ्यावर वार झाल्याने अभिषेकचा मृत्यू झाला असून त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
लग्नानंतर अभिषेक आणि  ऋषूला एक मूलही आहे. असे असतानाही भावांनी बहिणीचा संसारन उद्ध्वस्त केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ सक्रिय झाले आणि त्यांनी छापा टाकून मास्टरमाईंडसह पाच आरोपींना अटक केली. या ऑनर किलिंगमुळे लोक अचंबित झाले आहेत. सुमारे एक वर्ष ऋषू अभिषेकसोबत आनंदात संसार करत राहत होती. पण, तिच्या दोन्ही भावांना हे आवडत नव्हते. याप्रकरणी यमुनानगरचे पोलीस अधिकारी जगदीश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा