शत्रुघ्न सिन्हांची केंद्रीय मंत्र्यांवर टीका

मंत्रिमंडळातील एकाही सदस्याच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा नाही.


24th November 2017, 03:10 am
नवी दिल्ली : केंद्रातील मोदींच्या मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या १० टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांमध्ये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या कॅबिनेटवर हल्लाबोल केला. गुरुवारी पत्रकारांशी ते बोलत होते. मोदींचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या कामाबद्दल जनतेला कोणतीही माहिती नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही सदस्याच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा नाही. प्रत्येक मंत्री केवळ स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या मंत्रिमंडळावर शरसंधान साधले.