न्यूज डेस्क । गोवन वार्ता
फोंडा : गोव्यात ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. सर्वांनी मतदान करावे. ज्या श्रीरामांनी देशाला संस्कृती दिली, ज्या श्रीकृष्णांनी बोध केला, अशा राम-कृष्णांचा हा देश आहे. भारतात रामराज्यासाठी मतदान करा, असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले. आपण समृद्ध भारताचे नागरिक आहोत. संविधानानुसार सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, तो आपण सर्वांनी बजावलाच पाहिजे. जे सरकार आपल्या देशाला विकसित करते, लोककल्याण, जनहित, धर्माला व संस्कृतीला जपते, अशा सर्वांना आपण नेतृत्वाचा अधिकार दिला पाहिजे. सर्व गोमंतकीयांनी राष्ट्रधर्म, जनहित व स्वसंस्कृती जपणाऱ्याला मत द्यावे व जनहित जपणारे नेतृत्व निवडावे, असे आवाहन ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले आहे.