सावधान !!! गोव्यात उकाडा वाढणार... पारा ३६ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st May, 02:34 pm
सावधान !!! गोव्यात उकाडा वाढणार... पारा ३६ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता

पणजी : उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता आणखी तीव्र उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील सात दिवसांत कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील दोन दिवसांत कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. १ ते ३ मे दरम्यान वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली केली आहे.

खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान होते. बुधवारी मुरगाव येथे कमाल ३४.४ अंश तर किमान २७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पणजीतील कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस झाले होते. पणजीतील किमान तापमान सामान्य किमान तापमानपेक्षा १.२ अंश सेल्सिअसने वाढून २७.५ अंश सेल्सिअस झाले होते.

हवामान खात्याने १ ते ७ मे दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दरम्यान हिट इंडेक्स म्हणजे जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील सात दिवस राज्यातील सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याचा वेगात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. तर आज आणि उद्या राज्यातील वातावरण ढगाळ असण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा