दक्षिणेतील सुपरस्टार धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबतचे लग्न मोडल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. धनुष आणि ऐश्वर्याने १७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, लग्न मोडले! ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. दोघांच्या या निर्णयामुळे केवळ चाहतेच नाही तर त्यांचे कुटुंबीयही दु:खी झाले आहेत.
ऐश्वर्याचे वडील रजनीकांत यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र धनुषचे वडील आणि तमिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांनी या घटस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, धनुष आणि ऐश्वर्याचे नाते काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्यामुळेच तुटले. हा घटस्फोट नसून प्रत्येक विवाहित जोडप्यात होणारे घरगुती भांडण आहे. धनुष आणि ऐश्वर्या सध्या चेन्नईत नाहीत. दोघेही हैदराबादमध्ये आहेत. मी त्यांच्याशी फोनवर बोललो आहे आणि त्यांना काही सल्ला दिला आहे.